मुंबई : राज्यातील वाढते प्रदूषण आणि मुंबईतील खालावलेली हवेची गुणवत्ता यावरून शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्दयावरून केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला AQI वर सातत्याने ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असे रेट केले गेले आहे. महाराष्ट्रातील इतर शहरे देखील हवेच्या गुणवत्तेबद्दल पोस्ट करत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. “मी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या हवेच्या प्रदूषण संकटाबद्दल पत्र पाठवलं आहे. तसेच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण कोणतीही कारवाई होत नाही. बीएमसीची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्स केवळ त्यांच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी युक्ती आहे. मला आशा आहे की, या पत्राला प्रतिसाद देऊन हस्तक्षेप कराल.” असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलय.