मुंबई : सूर्यकुमार यादवचा षटकार, अश्वनी कुमारचे ४
विकेट्स, रायन रिकल्टनचे अर्धशतक अन् मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मधील पहिला दणदणीत विजय मिळवला. मुंबईने घरच्या मैदानावर केकेआरला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सचा पदार्पणवीर अश्वनी कुमारचे ४
विकेट्स, सर्व गोलंदाजांची योग्य साथ आणि रायन रिकल्टनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८
विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरला १६.२ षटकांत ११६ धावांवर सर्वबाद केलं. तर
नंतर ८
विकेट्सने आणि ४३
चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबईने आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 12.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहजप पूर्ण केलं.
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ च्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण
मुंबई इंडियन्सने केकेआरविरूद्ध तिसऱ्या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी दणक्यात पुनरागमन केलं आहे. या
विजयासह मुंबईचा संघ आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी पोहाचला आहे.
केकेआरने वानखेडेच्या मैदानावर दिलेल्या ११७ धावांच्या छोट्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने सावध सुरूवात केली. रोहित शर्माने एक
षटकार खेचला खरा पण
तो पुन्हा एकदा फेल ठरला. रोहित शर्मा १३
धावांवर बाद झाला. तर
यानंतर रायन रिकल्टनने संघाच्या विजयाची जबाबदारी केली. रिकल्टनने ४१
चेंडूत ४
चौकार आणि ५
षटकारांसह ६२
धावांची खेळी केली. तर
विल जॅक्सही १
षटकार लगावत १६
धावा करत बाद झाला.
वानखेडेच्या मैदानावर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फॉर्मात परतला आणि त्याच्या वादळी फटकेबाजीचा एक
नमुना पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव गेल्या काही काळात फॉर्मात नव्हता, पण
वानखेडेच्या मैदानावर उतरताच सूर्याने आपली वादळी खेळी केली. सूर्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने ९
चेंडूत ३
चौकार आणि २
षटकारांसह २७
धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. केकेआरकडून आंद्रे रसेलला दोन विकेट घेण्यात यश
मिळाले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा
निर्णय अगदी योग्य ठरला. बोल्ट आणि चहर या
गोलंदाजी जोडीने केकेआरची झोप उडवली. संघाचे दोन्ही सलामीवीर १
धावा करत माघारी परतले. यानंतर अजिंक्य रहाणे ११
धावा तर
अंगक्रिश रघुवंशी २६
धावाच करू शकला. रिंकू सिंग १७
धावा, मनिष पांडे १९
धावा तर
रमणदीप सिंग २२
धावा करत बाद झाला.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर केकेआरच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली. पॉवरप्लेमध्येच केकेआरचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मुंबईचा पदार्पणवीर अश्वनी कुमार या
सामन्याचा हिरो ठरला. ज्याने ३
षटकांत २४
धावा देत ४
विकेट्स घेतले. दीपक चहरने २
तर बोल्ट, हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथूर आणि सँटरन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.